मुंबई: उपराष्ट्रपती पदाचे INDIA आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस खासदारांची भेट घेतली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “देश संकटात आहे, मला संधी मिळाली तर संविधानाचे संरक्षण करेन. पाठिंब्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांना पत्र लिहिणार असून भाजप खासदारांनाही भेटेन. उपराष्ट्रपती निवडणुकीत व्हीप नसल्याने गुप्त मतदानातून पाठिंबा मिळू शकतो.”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. निकाल चमत्कारिक असू शकतो.”
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी विश्वास व्यक्त केला की, “इंडिया आघाडीचा उमेदवार बहुमत नसतानाही विजयी होऊ शकतो.”
या वेळी काँग्रेस नेते व खासदार उपस्थित होते.