महाराष्ट्र ताज्या बातम्या

Vote Chori: “भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच” – इंद्रजीत चव्हाण

कराड : माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केलेले दुबार मतदार नोंदणीचे आरोप सरळसरळ असत्य आहेत. हे आरोप म्हणजे कराड दक्षिणेत झालेल्या मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठी भाजपने रचलेली केवळ खोटी कथा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

चव्हाण म्हणाले, “मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. भाजपकडून केलेले आरोप हे केवळ पृथ्वीराज चव्हाणांचे (Prithviraj Chavan) नाव घेऊन झालेली मतांची चोरी (Vote Chori) लपवण्यासाठी आहेत.”

या पत्रकार परिषदेला गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “दुबार मतदार नोंदणी आणि बोगस मतदान यात फरक आहे. आमच्या कुटुंबातील सदस्यांची दुबार नोंदणी झाल्याचे लक्षात येताच आम्ही निवडणूक आयोगाकडे योग्य अर्ज करून नाव कमी करण्याची कार्यवाही केली होती. तरीसुद्धा मतदार यादीत दुबार नावे राहिली, ही चूक आयोगाची (election commission) आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, मतदार यादीतील घोळ हा मूळ प्रश्न असून ती दोषमुक्त होणे आवश्यक आहे. “परंतु निवडणूक आयोगावर टीका केली की तात्काळ भाजप पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. यावरूनच निवडणुकीदरम्यान नेमके काय प्रकार झाले ते स्पष्ट होते.”

इंद्रजीत चव्हाण पुढे म्हणाले, “माझ्या वयात व मतदार यादीत नोंद झालेल्या वयात तफावत आहे. जर आमची नोंदणी नजीकची असेल तर ती सिद्ध करावी. तसेच जर खरोखरच दुबार मतदान झाले असेल तर त्याचे ठोस पुरावे सादर करावेत. केवळ राजकीय फायद्यासाठी आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे होय.”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात