ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? ठाकरें गटाच्या याचिकेवर 19 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी!

मुबंई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray group) मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच आता ठाकरें गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या (Shivsena) निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 19 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत फूट पाडली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली., शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार, याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते. अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे. शिवसेना कुणाची याचा येथे 19 जुलैला फेसला होणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच (Vidhan Sabha Election 2024) खरी शिवसेना नेमकी कुणाची? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.या याचिकेवरील सुनावणी देखील १९ जुलैला होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि महायुतीला फटका दिला.पक्षाचे चिन्ह, नाव नसतानाही ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळाल्या. सत्ता, यंत्रणा, पक्ष, चिन्ह असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या.. ठाकरेंच्या या लोकसभेच्या यशानंतर शिवसेना कोणाची याबाबत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात