ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज का? ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा सवाल

मुंबई

ज्या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्व्हेक्षणाचा अहवाल आल्यानंतर १५ फेब्रुवारीच्या दरम्यान विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

परंतु या विशेष अधिवेशनाची गरज काय असा सवाल ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने जो सर्वे केला त्यातून दोन गोष्टी मिळणार आहेत. एक तर मराठा समाजाचा इम्प्रिकल डाटा आणि दुसरं म्हणजे कलम ३४० प्रमाणे १५(४) आणि १६(४) प्रमाणे मराठा समाज मागासवर्गीय असून ते ओबीसीच्या पात्रता पूर्ण करीत आहे, असे अहवालामध्ये शिफारसी असतील. या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास सरकारला मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याचा अधिकार आहे. दुसरा कुठल्या ही प्रवर्गाचे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाही. त्यामुळे असा कायदा पारित करणे गैर होईल आणि म्हणून विशेष अधिवेशनाची गरज नाही, असं राठोड म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास मंत्रिमंडळात निर्णय घेऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करून भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे कुणबी-मराठा एकत्र करून त्यांना वेगळे आरक्षण देता येईल. यासाठी कायदेशीररित्या विशेष अधिवेशनाची मुळीच गरज नाही, असे मत ओबीसी नेते तथा आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात