महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “लाडक्या बहिणींना अडवले ते तुम्ही; योजना बंद करण्यासाठी कोर्टातही तुम्ही गेलात”— उपमुख्यमंत्री शिंदे  

नागपूर : हिवाळी अधिवेशनात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत करारी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “योजना सुरू होताच तिला ‘फसवी घोषणा’ म्हणणारे तुम्हीच. इतकेच नाही, योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले तेही तुमचेच नेते. वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते का? मग आज कोणत्या तोंडाने ‘लाडक्या बहिणी’चा मुद्दा काढता?”

त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला.

शिंदे यांनी स्पष्ट केले की विरोधकांच्या प्रयत्नांना हायकोर्टानेच फटकारले होते. ते म्हणाले, “महिलांचा लाभ थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही तो होऊ दिला नाही.” आचारसंहितेतही लाभार्थ्यांना अडथळा येऊ नये म्हणून शासनाने अॅडव्हान्स निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

“लोकांचे पैसे लोकांनाच देण्याची दानत आम्ही दाखवली. तुमच्या सरकारकडे कधी नव्हती,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. दिलेली सर्व वचने योग्य वेळी पूर्ण करण्यात येतील.” त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला, “लाडक्या बहिणींनीच तुमचा टांगा पलटी केला आहे. त्यामुळे या योजनेविरुद्ध आता एकही शब्द काढू नका.”

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात