महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे इच्छुक अनेक

X : @ ajaaysaroj

बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर , बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यावेळी उपस्थित होते.
पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून , माजी मंत्री ,जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषाताई निमकर, माजी खासदार बळीराम जाधव , बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील, वाडा येथील माजी पंचायत समितीचे सभापती संतोष बुकले , जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव आणि पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग गोवारी यांनी आज बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर , ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत पालघर मतदारसंघात येत असणाऱ्या , डहाणू , विक्रमगड , पालघर , नालासोपारा , बोईसर आणि वसई या सहा विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची असणारी ताकद , तेथील नागरी समस्या , विरोधकांची स्ट्रॅटेजी यावर मुद्देसूद चर्चा झाली. डहाणू , पालघर व विक्रमगड या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत , तर वसई , नालासोपारा व बोईसर येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. महाविकास आघाडीने इथून भारतीताई कामडी यांना उमेदवारी दिली आहे , तर महायुतीने अजून आपला उमेदवार घोषित केलेला नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ इतकी घसघशीत मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ४७ टक्के मतं बविआने पटकावली होती हे इथे महत्त्वाचे आहे. भाजप शिवसेना युती एकत्र असताना राजेंद्र गावित जेमतेम २३,४०४ मतांनी इथून निवडून येऊ शकले होते. बविआची इथे हक्काची पाच लाखाच्या घरात मतं आहेत , इथून उमेदवार नक्की निवडून येऊ शकतो अशी खात्री आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांना असल्याने , हा लोकसभा मतदारसंघ लढवायचाच असा निश्चय बविआने केला आहे. त्यामुळे इथून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या देखील जास्त आहे.

काही दिवसांतच उमेदवार जाहीर करण्यात येईल असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात