महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला विशेष दिलासा पॅकेज द्या : किसान सभा

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या 60 दिवसाच्या कालावधीत विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

शेतीमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे धोरण, वाढता उत्पादन खर्च व नैसर्गिक आपत्तीत होणारे शेतकऱ्यांचे नुकसान या प्रमुख कारणांमुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या वाढत आहेत.

केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून शेतीमालाला रास्त दर देत, नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरण घ्यावीत. महाराष्ट्रात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर वरील प्रमुख बाबींचा समावेश असणारे दिलासा पॅकेज शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने कॉम्रेड अजित नवले यांनी केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात