महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी एकसमान नियमावली लागू होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांना एकाच नियमावलीत आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स आणि ट्रॅफिक समस्यांसंदर्भात तक्रार निवारणासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आज मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर, तसेच विविध प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना
सरनाईक म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणाचा अभ्यास करून या कंपन्यांना एकत्र आणले जाईल. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात येईल. चारचाकी, बाईक व टॅक्सी सेवा अंतर्गत महिलांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. महिला चालकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही याच बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनीं यावेळी स्पष्ट केले.

वाहतूक धोरणातील महत्त्वाच्या बाबी अंतर्गत परिस्थीतिचाही सविस्तर आढावा घेण्यात आला असून वाहतूक धोरणात काही बदल करताना सुस्थितीत वाहने, प्रवाशांसाठी तत्पर सेवा, हेल्मेट अनिवार्य करणे, महिला चालकांच्या सुरक्षेची काळजी घेणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सादरीकरणाद्वारे सांगितल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

खास करून एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात २५ खाटांचे तर मुंबईतील बोरिवली येथे १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असून या रुग्णालयांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कॅशलेस उपचार, तसेच पाच लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्च राज्य सरकार करेल, अशीही घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली. यावेळी पुणे, कोल्हापूर, पुसद, आणि वाशिम येथे रुग्णालय उभारण्यासंदर्भातील प्रकल्पांचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.

या निर्णयांमुळे प्रवासी वाहतूक क्षेत्रात एकसमानता निर्माण होईल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी मोठा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात