महाराष्ट्र ताज्या बातम्या

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा; तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई – “ज्यांची जेवढी लोकसंख्या, तेवढा त्यांचा हक्क,” या तत्त्वानुसार देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने केली. प्रारंभी विरोध दर्शवलेल्या भाजपाला अखेर ही मागणी मान्य करावी लागली. आता सरकारने तातडीने जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून, तेलंगणा व कर्नाटकप्रमाणे पद्धत राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ म्हणाले, “जातनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी नाही, तर तो एक व्यापक सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रातील ओबीसींचे प्रमाण सध्याच्या २७ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. ही जनगणना झाल्यास मराठा, पाटीदार, गुर्जर आदी समुदायांच्या आरक्षणासंबंधीचे प्रश्नही मार्गी लागतील.”

“राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच केंद्र सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला. आता ही प्रक्रिया पारदर्शक व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवावी, यासाठी सरकारने आवश्यक प्रशिक्षण द्यावे,” असेही ते म्हणाले.

सपकाळ यांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या ‘पलायन रोको, नोकरी दो’ अभियानासाठी जात असताना राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवल्याचा तीव्र निषेध केला. “विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास जाताना त्यांना अडवणे ही तानाशाही असून, हा प्रकार लोकशाही मूल्यांवर घाला घालणारा आहे,” असे ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील भाजपाचे मंत्री विजय शाह यांनी निवृत्त कर्नल सोफिया यांच्याविषयी वापरलेल्या अश्लील व अपमानास्पद वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले, “हा देशाच्या सन्मानाचा मुद्दा असून, विजय शाह यांना तात्काळ मंत्रीपदावरून हटवून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.”

“हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असतानाही शाह सुप्रीम कोर्टात गेले आणि तेथूनही फटकारले गेले. तरीही भाजपाचे नेते त्यांना पाठीशी घालतात, हे निंदनीय आहे,” असे ते म्हणाले.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात