महाराष्ट्र ताज्या बातम्या

घरकुलासाठी वाळू पोहोचविणारे नवीन धोरण येणार – महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या वाळूची वाहतूक परवडणारी व्हावी म्हणून वाळू थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे नवीन धोरण लवकरच तयार करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

ज्येष्ठ भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत प्रश्न केला, “सामान्य जनतेच्या कष्टातून राज्य उभे राहते, मग त्यांना घरकुलासाठी वाळू उपलब्ध का होत नाही? घरकुलासाठी वाळू थेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असे धोरण तयार करणार का?”
त्यांनी यावेळी महसूलमंत्र्यांच्या कामाच्या वेगावर भाष्य करत “बुलेट ट्रेनसारखे मंत्री, पण निर्णय पॅसेंजरसारखे” असा टोला देखील लगावला.

ज्येष्ठ काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही मुद्दा उपस्थित करत सांगितले की, “गोंदिया, तिरोडा, अर्जुनी भागात गरीब लोकांना घरासाठी दूरवरून वाळू आणावी लागते. त्यांना वाहतूक खर्च परवडत नाही. काही ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे, त्यांना परवानगी आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला.

या चर्चेला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, “राज्यात कोठेही घरकुलासाठी वाळू सहज उपलब्ध व्हावी, हीच शासनाची भूमिका आहे. जे बेकायदेशीर वाळू उपसा करतील, त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील.”

ते पुढे म्हणाले, “चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे जिथे वाळूप्रक्रियेच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची रॉयल्टी मिळाली आहे.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात