महाराष्ट्र ताज्या बातम्या

Jain Boarding controversy: जैन बोर्डिंग आणि वसतिगृह पूर्ववत होईपर्यंत पाठपुरावा करणार – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग आणि वसतिगृह (Pune Jain Boarding) प्रकरणात राज्य सरकार सकारात्मक आहे. बोर्डिंग आणि वसतिगृह पूर्ववत होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी जैन मुनींना दिलासा देत सांगितले.

मॉडेल कॉलनीतील या बोर्डिंगच्या जमिनी आणि मंदिर गहाण ठेवून सुमारे ७० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर जैन समाजात तीव्र संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी आज जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनी आणि समाज प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले की, “जैन बोर्डिंगची जागा परत मिळवण्यासाठी सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. व्यवहारात सहभागी असलेल्या बिल्डरनेही सहकार्याची भूमिका घेतली आहे आणि त्याने स्वतः पत्राद्वारे व्यवहार रद्द झाल्याचे कळवले आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणावर गांभीर्याने विचार करत असून, बोर्डिंग आणि मंदिर पुन्हा जैन समाजाकडे परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

जैन समाजाकडून गेल्या काही आठवड्यांपासून आंदोलन, निदर्शने आणि सोशल मीडियावर जनजागृती मोहिमा सुरू आहेत. समाजाच्या या लढ्याला पाठिंबा देत उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, “जैन समाजाच्या भावना मी समजतो. सर्व व्यवहार रद्द होऊन जैन बोर्डिंगचं नाव आणि हक्क पुन्हा त्याच ठिकाणी लागू पर्यंत मी स्वतः विधानसभा उपाध्यक्ष या नात्याने या प्रकरणावर लक्ष ठेवणार आहे.”

अण्णा बनसोडे यांनी या प्रसंगी आंदोलन करणाऱ्या जैन मुनी, समाजनेते, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत म्हटलं की, “संपूर्ण जैन समाज शांततेत आणि संयमाने आपला न्याय्य लढा लढत आहे. त्यांच्या एकतेचा आणि संयमाचा आदर्श इतर समाजांनी घ्यावा.”

या भेटीदरम्यान माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जैन बांधव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जैन समाजातील अनेक प्रतिनिधींनी उपाध्यक्ष बनसोडे यांचे आभार मानत या प्रश्नाचे लवकर निराकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात