महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मागाठाणे पाडकामावर विधिमंडळात संतापाचा स्फोट; बाऊन्सर्स कुणी आणले याची चौकशी करणार—उदय सामंत

नागपूर –: मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांवर विकासक–मनपा अधिकारी संगनमताने, बाऊन्सर्सच्या मदतीने अमानुष पद्धतीने घातलेला घाला हा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत प्रचंड गाजला.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताच सत्तारूढ सदस्यांनीही संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुर्वे म्हणाले, “बाऊन्सर्सनी रहिवाशांना घरातून सामानसुद्धा काढू दिले नाही. हिंदू मंदिराला कुलूप ठोकण्यात आले. सर्व मराठी घरे आहेत… एवढी निर्दयता का?”

या मुद्द्याला मनीषा चौधरी आणि ज्येष्ठ विरोधी सदस्य भास्कर जाधव यांनीही जोरदार समर्थन दिले. त्यांनी विकासक–अधिकारी संगनमताचा मुद्दा उपस्थित करत ही कारवाई थांबवून रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली.

उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, “संपूर्ण प्रकरणाचे पुरावे तपासले जातील. बाऊन्सर्स कोणाच्या आदेशावर आणले? कोणाकडून नियुक्त केले? याची चौकशी केली जाईल. अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांच्या आत चौकशी अहवाल मागवला जाईल.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात