मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागणीनंतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, तसेच स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मंत्रालयातील वनमंत्र्यांच्या दालनात निवेदन सादर केले होते.
निवेदनातील मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले.
यावेळी नगरसेवक श्री. धरम काळे, ऍड. संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

