महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये श्वास घ्यायलाही त्रास… कचऱ्याने गाव गुदमरलं!  

Massive garbage pile at Ladvali dumping ground in Mahad, Raigad, with an excavator machine highlighting poor waste management conditions

महाड : महाड नगरपरिषदेच्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक त्रस्त झाल्याने अखेर ग्रामस्थांनी नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे थेट जाब विचारला. येत्या आठ दिवसांत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महाड शहरातून दररोज गोळा होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतो. नगरपरिषदेच्या मते, येथे कचऱ्याचे वर्गीकरण व शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. मात्र प्रत्यक्षात या कचऱ्यामुळे वाढवली, गुंडाळे, देऊळकोंड आणि परिसरातील सुमारे २१ वाड्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

Unsegregated waste dumped inside a processing shed raises questions over the municipal claim of scientific waste management

या डम्पिंग ग्राउंडमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आजारपण वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तसेच महिलांमध्ये व वृद्धांमध्ये श्वसन व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचेही समोर आले.

Workers forced to sit and eat amid garbage piles at the dumping site, reflecting neglect and unsafe working conditions

ग्रामस्थांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, या डम्पिंग ग्राउंडमुळे गोडाळे परिसरातील नदी प्रदूषित झाली असून पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. परिणामी जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील विहिरीही दूषित झाल्याचा आरोप करण्यात आला.

यावर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी फवारणीसारख्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी हे उपाय अपुरे असल्याचे सांगत “फवारणी नको, डम्पिंग ग्राउंडच बंद करा” अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या कक्षात जाऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Open dumping continues at Ladvali site, raising concerns over environmental damage and groundwater contamination

नगराध्यक्ष कविस्कर यांनी तातडीने दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असले, तरी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

1 Comment

  1. vorbelutr ioperbir

    April 17, 2026

    Hi, i read your blog from time to time and i own a similar one and i was just curious if you get a lot of spam remarks? If so how do you reduce it, any plugin or anything you can recommend? I get so much lately it’s driving me insane so any support is very much appreciated.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात