महाराष्ट्र ताज्या बातम्या

दशावतार कलावंतांना पेन्शन योजनेत समावेश; अनुदान दुप्पट करणार, १५ दिवसांत शासन निर्णय

सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार विधानसभेत दशावतार कलावंतांच्या पेन्शन आणि अनुदानाबाबत उत्तर देताना

मुंबई : वृद्ध कलावंतांसाठी असलेल्या पेन्शन योजनेत दशावतार कलावंतांचाही समावेश केला जाणार आहे. तसेच कलापथक प्रमुखांना मिळणारे अनुदान दुप्पट करण्यात येणार असून त्यातील निम्मी रक्कम थेट कलावंतांना मिळेल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केली.

या संदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत जारी करण्यात येईल. तसेच दशावतार कलावंतांना ओळखपत्रे देण्याची तरतूदही त्यामध्ये केली जाईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कला ही प्राचीन लोककला असून कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, हजारो दशावतार कलावंतांसाठी एक वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, असा मुद्दा राणे यांनी उपस्थित केला.

ओळखपत्र नसल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या दशावतार कलावंतांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन कलावंतांचाही हा विषय असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे मान्य केले. या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर दिरंगाई झाल्याचेही त्यांनी सांगितले. या दिरंगाईची सचिव स्तरावर चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणातील दशावतारासह पाच लोककलांना आधार देण्यासाठी अनुदान दुप्पट करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणाही शेलार यांनी विधानसभेत केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात