Twitter : @therajkaran
मुंबई
सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्वास नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रियाताई सुळे (NCP MP Supriya Sule) मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हिंगोलीतील सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली, याबाबत खा. सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भुजबळ हे वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांनी व्यासपीठावरुन त्यांच्या मागण्या न सांगता त्यांच्या मागण्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडाव्यात, वा कमराबंद चर्चेत सांगाव्यात. तो त्यांचा अधिकार आहे. जर मंत्री बाहेरील व्यासपीठावरुन मागण्या करत असतील तर कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम (Reservation to Maratha, Dhangar, Lingayat and Muslim) समाजाच्या ज्या-ज्या मागण्या आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. यात शंकाच नाही.
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा (farmers) मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.