महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

छगन भुजबळांनी व्यासपीठावरून नव्हे तर कॅबिनेटमध्ये भूमिका मांडवी : सुप्रिया सुळे

Twitter : @therajkaran

मुंबई

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रियाताई सुळे (NCP MP Supriya Sule) मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

हिंगोलीतील सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली, याबाबत खा. सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भुजबळ हे वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांनी व्यासपीठावरुन त्यांच्या मागण्या न सांगता त्यांच्या मागण्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडाव्यात, वा कमराबंद चर्चेत सांगाव्यात. तो त्यांचा अधिकार आहे. जर मंत्री बाहेरील व्यासपीठावरुन मागण्या करत असतील तर कॅबिनेटमध्ये कसली चर्चा होते? असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला.

त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम (Reservation to Maratha, Dhangar, Lingayat and Muslim) समाजाच्या ज्या-ज्या मागण्या आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. यात शंकाच नाही.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा (farmers) मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे