कोल्हापूर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. जरागेंनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कलम ३७ अ नुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर सरकारने शिंदे समिती स्थापन केली. शिंदे समितीने केलेल्या शिफारशीनंतर राज्यभरात कुणबी नोंदी सापडल्या. आता त्याच अहवालाच्या आधारे येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. पण राज्य सरकारची ही भूमिका मान्य नसून 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्यावं आणि तेही सरसटक द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.