ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न खोळंबली, किसान सभेचा घणाघात

मुंबई

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षांच्या गणित बिघडलं असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे एक हजारहून अधिक विवाह होऊ शकलेले नाहीत. अर्थकारण कोलमडल्यामुळे विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याशिवाय राज्यातील तब्बल २ हजार ५०० ते ३ हजार विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशांअभावी पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. केंद्राचा निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

७ डिसेंबर रोजी केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी आणली. निर्यातबंदी लावण्यात आली तेव्हा कांद्याला ३ हजार ८०० ते ४ हजार प्रति क्विंटल भाव होता. आज तोच भाव १ हजार ७०० ते २ हजारांपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे महिन्याला तब्बल हजार कोटींचं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात