ताज्या बातम्या राष्ट्रीय

Rajya Sabha : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्र मात्र प्रतीक्षेतच!

नवी दिल्ली

भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. १५ राज्यांतील ५६ राज्यसभा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. दरम्यान भाजपकडून बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नसून सध्या आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदा महाराष्ट्रातून ६ खासदाराची राज्यसभेत वर्णी लागणार आहे. यातील ५ उमेदवार महायुती आणि १ उमेदवार काँग्रेसचा असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. नितीश कुमार यांचे माजी सहकारी भीम सिंह यांनाही संधी मिळाली आहे. तर भाजपने बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना उमेदवारी दिलेली नाही. या यादीमध्ये एकाही केंद्रीय मंत्र्याला तिकीट दिल्याचं दिसत नाही.

यंदा राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार असून 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण झाला आहे. आणखी 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 56 सदस्य 23 फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या 7 खासदारांचा कार्यकाळ २ ते ३ एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.

उमेदवारांच्या नावांची यादी
बिहार : डॉ. धर्मशीला गुप्ता, डॉ. भीम सिंह छत्तीसगड : राजा देवेंद्र प्रताप सिंह हरियाणा : सुभाष बराला
कर्नाटक : नारायण कृष्णासा भंडगे, यूपी : आरपीएन सिंह, डॉ. सुधांशू त्रिवेदी, चौधरी तेजवीर सिंह, साधना सिंह, अमरपाल मौर्य, डॉ. संगीता बलवंत, नवीन जैन
उत्तराखंड : महेंद्र भट्ट
प. बंगाल : समिक भट्टाचार्य

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे