मुंबई :विधानसभेत आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रश्नोत्तरे पुकारण्यात आली, मात्र संबंधित खात्यांचे मंत्री गैरहजर असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रश्नोत्तराच्या वेळी संबंधित खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे पहिल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रलंबित राहिली, ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले आणि मंत्र्यांनी विधान परिषद व विधानसभेतील जबाबदाऱ्या समतोल ठेवत प्रश्नोत्तर तासाला उपस्थित राहावे, असा स्पष्ट निर्देश दिला.