मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

बेस्टच्या दुप्पट दरवाढीला आदित्य ठाकरे यांचा तीव्र विरोध; सेवा सुधारण्याची केली मागणी

मुंबई : मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेच्या दुप्पट दरवाढीच्या प्रस्तावाला आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या २-३ वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून बेस्टकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी बेस्ट वाचवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.

“सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणं कठीण व्हावं, असा सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा म्हणून ओळख असलेल्या बेस्टचं अधःपतन आम्ही सहन करणार नाही,” असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, “बसेसची संख्या आधीच रोडावली आहे, अनेक महत्वाचे मार्ग बंद केले आहेत आणि आता जर दरवाढ केली, तर त्याचा बेस्ट सेवेवर गंभीर परिणाम होईल.” त्यामुळे त्यांनी बेस्टची दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच त्यांनी, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवावी, बेस्टचा दर्जा सुधारावा आणि मुंबईकरांना चांगली व सुरक्षित सेवा द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात