महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ अखेरपर्यंत खुले होतील – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: ठाण्यातील मेट्रो ४ (वडाळा–कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या मेट्रो ११ शी जोडल्या जाणार असून, एकूण ५८ किमीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका पुढील वर्षअखेर प्रवाशांसाठी खुली होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ४ व ४ अ च्या प्राधान्य विभागावर (गायमुख जंक्शन–घोडबंदर रोड–कासारवडवली–विजय गार्डन) तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, घाटकोपर–मुलुंड–गायमुख या ३५ किमी लांबीच्या मार्गिकेत ३२ स्थानके असून प्रकल्पावर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागेत डेपो उभारले जात आहेत. या मार्गिकेमुळे पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबई शहर यांना थेट जोडणी मिळणार आहे. मेट्रोचे सर्व टप्पे सुरू झाल्यावर दररोज १३ लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील आणि रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ५८ किमी लांबीचा हा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प हा भारतातील पहिलाच असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तो महत्त्वाचा ठरेल.

या मेट्रो ट्रेनमध्ये BEML चे ६-डब्यांचे सेट, अत्याधुनिक ट्रेन कंट्रोल सिस्टम, आपत्कालीन संपर्क सुविधा, स्वयंचलित अग्निशमन शोध, अडथळा शोध यंत्रणा, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली आदी सुविधा असतील.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात