महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील सत्तर हजार कुटुंबांना मालकीहक्काचा मार्ग मोकळा; ‘हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द’ (सुधारणा) विधेयक विधानसभा एकमताने मंजूर

नागपूर – मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील सुमारे सत्तर हजार निवासी कुटुंबांना मालकीहक्काचा मार्ग मोकळा करणारे महत्वाचे ‘हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करणे (सुधारणा) विधेयक २०२५’ आज विधानसभेत एकमताने संमत झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.

बावनकुळे म्हणाले की या विधेयकामुळे ७ लाख ४३ हजार हेक्टर जमिनींवर वसलेल्या निझामशाही काळातील मदतमास (देवस्थान वगळून) जमिनींचे निवासी हक्क स्पष्ट करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या जमिनींवर राहणाऱ्या लाखो नागरिकांना ४०० वर्षे जुनी कागदपत्रे शोधणे, सिद्ध करणे अत्यंत अवघड जात होते. त्यामुळे घरे आपल्या नावावर करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. “या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने लोकांच्या मालकीहक्काचा प्रश्न सुटणार आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे पुढे म्हणाले, “राज्यातील विविध विभागांमध्ये जमिनींबाबत अशाच समस्या आहेत. योग्य कायदे सुधारणा करून लोकांना दिलासा देणार आहोत.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात