मुंबई

राज्यात बांगलादेशी घुसखोरांना प. बंगाल, आसाम, कर्नाटक येथून कागदपत्रे; १४ जणांना अटक – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटक येथून आधारकार्ड व अन्य कागदपत्रे मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली. सोलापूरमध्ये १२ आणि मुंबई व बंगलोरमध्ये आणखी दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत सोलापूर एमआयडीसी आणि कणबस (दक्षिण सोलापूर) परिसरात बेकायदेशीररित्या आलेले बांगलादेशी मोठ्या संख्येने राहत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच, हे घुसखोर स्थानिक कागदपत्रे मिळवून राज्यात राहत असल्याचा गंभीर प्रकारही त्यांनी अधोरेखित केला.

गृहराज्यमंत्री भोयर यांनी उत्तर देताना सांगितले की, एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील एका कारखान्यात १२ बांगलादेशी अनधिकृतरित्या राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या जबाबानंतर बंगलोर आणि भिवंडी येथून आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपींकडून १२ मोबाईल, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले असून, एकूण किंमत ६८,५०० रुपये आहे. संबंधित कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोणालाही कामावर घेताना हमीपत्र घेणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करत अवैध घुसखोरीप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव