महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात १०,७७३ गृह प्रकल्पांना महारेराची नोटीस; १,९५० प्रकल्पांची बॅंक खाती गोठवली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या राज्यातील १०,७७३ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, १,९५० प्रकल्पांचे बॅंक खाते गोठवण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

आमदार सरोज अहिरे आणि संजय केळकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, विकासकांनी ३० दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मुदतवाढीचा अर्ज किंवा भोगवटा प्रमाणपत्र महारेराकडे सादर करावे. अन्यथा, महारेरा संकेतस्थळावर प्रकल्पास तात्पूरती स्थगिती देणे, बॅंक खाती गोठवणे आणि प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवर निर्बंध आणणे अशा कारवाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

बॅंक खाते गोठवण्यात आलेल्या १,९५० प्रकल्पांपैकी १०६ विकासकांनी मुदतवाढ मिळवली किंवा भोगवटा प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. तसेच, ८,८२३ प्रकल्पांची छाननी प्रक्रिया सुरू आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात