ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजनेवर बंदी, आदित्य ठाकरेंकडून निकालाचं स्वागत

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित केली असून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. एक “घटनाबाह्य” योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आता महाराष्ट्राला आशा आहे की, इथली घटनाबाह्य राजवट पण अशीच रद्द केली जाईल. निवडणूक रोख्यांची अपारदर्शक योजना रद्द करण्याच्या आजच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. आता आम्हाला आशा आहे की ह्यापुढे पारदर्शकता बाळगली जाईल आणि आदेशातील प्रत्येक शब्द वेळेत पाळला जाईल, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, यापुढे मतदारांना पक्षाच्या निधीबाबत जाणून घेण्याचा अधिकार असेल. बॉण्ड खरेदी करणाऱ्यांची यादी सार्वजनिक करावी लागेल असंही यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आलं.

सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे