मुंबई ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणी प्रश्नावर श्वेत पत्रिका काढा : आशिष शेलार 

X : @therajkaran

मुंबई: तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नाही, यामागील वास्तव स्पष्ट होण्यासाठी “मुंबईच्या पाणी प्रश्नावर” श्वेतपत्रिका (White paper on Mumbai’s water crisis) काढावी, अशी मागणी भाजप ज्येष्ठ सदस्य ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. वांद्रे-वरळी कोस्टल रोड आणि वांद्रे -वर्सोवा सागरी रस्ता या दोन्ही प्रकल्पात नुकसान भरपाईचे निकष वेगळे आहेत, ते समान असावेत, अशी सूचना त्यांनी केली.

विधानसभेत आज सत्ताधारी पक्षातर्फे मुंबईच्या समस्या व विकास या विषयावर नियम -२९३ नुसार प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर आशिष शेलार बोलत म्हणाले, मुंबई शहर आणि उपनगरात असमान पाणीपुरवठा होत आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रचंड तुटवडा मुंबईला जाणवत आहे. महापालिकेतर्फे मुलुंड आणि वांद्रे पश्चिम म्हणजे एच पश्चिम या दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी 400 कोटी रुपये केवळ कन्सल्टंटला देण्यात आले. या प्रकरणांमध्ये कुठला गैरव्यवहार झाला? याची चौकशी करा, अशी मागणीही शेलार यांनी केली.

ते म्हणाले, आघाडी सरकार असताना मेट्रोचे काम दोन वर्ष आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले. ती मेट्रो आता सुरू झाल्यानंतर आठ कोटी लोकांनी प्रवास केला. प्रती दिनी दोन लाख 35 हजार प्रवासी करतात, म्हणजेच उबाठाने एवढ्या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती, केवळ अहंकारातून आरे कारशेडचे जे काम अडवले होते, त्यामुळे मुंबई मेट्रोचा खर्च 10 हजार कोटी रुपयांनी वाढला. याबाबतही एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुमारे २० लाख रिक्षा टँक्सी असे मिळून काही लाख वाहने मुंबईत आहेत. अनेक वर्षे पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मुंबईतील पार्किंग समस्येचा प्रश्न कधीच पडला नाही. त्यामुळे आता शासनानेच महापालिकेला सांगून मुंबईचा मेगा पार्किंग प्लॅन तयार करावा, अशी मागणी शेलार यांनी केली.

वांद्रे रेक्लेमेशन (Bandra Reclaimation) येथील एमएसआरडीसीचा भूखंड विकून वांद्रे -वर्सोवा सागरी सेतू पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या जागेवर आता विविध बांधकाम झाल्यानंतर शिल्लक मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात यावे, अशी सूचनाही शेलार यांनी केली.

विक्रोळी येथे प्रत्यक्ष सुरू झालेले बुलेट ट्रेनचे काम अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक आणि वेळेची बचत करणारे एक अद्भुत असे काम आहे. ही एक बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरू झाली की देशभर हे जाळे विणले जाईल. पण दुर्दैवाने ही बुलेट ट्रेन रोखण्याचे काम उबाठाने केले, असा आरोप शेलार यांनी केला. सागरी सेतूचे काम एमएसआरडीसी करीत असून कोस्टल रोडचे अर्धे काम मुंबई महापालिका करीत आहे. या कामामुळे कोळी बांधवांचे जे नुकसान होते, त्याची मोजदाद करण्याचे निकष समान असावेत, अशी मागणीही आशीष शेलार यांनी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज