महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bogus Doctor Case : बोगस डॉक्टर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तीव्र भूमिका – दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागाला घेराव

मुंबई : सांताक्रूझ येथील बी.एन. देसाई रुग्णालयासह मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर नेमण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या गंभीर गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त (आरोग्य विभाग) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

त्रिभाषा धोरणावर राज्य सरकारचा नवा उपाय

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरणानुसार पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याने निर्माण झालेल्या वादळानंतर राज्य सरकारने आता नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शालेय शिक्षणात भाषिक संतुलन, विद्यार्थ्यांच्या करिअरला लागणारी भाषा कौशल्यं, तसेच प्रादेशिक भाषेचा विकास या तिन्ही अंगांचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे त्रिभाषा धोरणाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सागर नाईक यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत; प्रभाग रचनेवर भाजपची हरकत

By प्रतिक यादव नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने नुकतीच जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचना व सीमांकनासंदर्भात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर सागर नाईक यांच्या नेतृत्वाखाली माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक (आताचे भाजप नेते) तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक उपायुक्त डोईफोडे यांची भेट घेऊन आपली हरकती व सूचना नोंदविल्या. विद्यार्थीदशेपासूनच सक्रिय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

US Tariff: आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र – पॉवरलूम उद्योगावर अमेरिकन टॅरिफचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारचा स्पष्ट कृती आराखडा सादर करावा

मुंबई – अमेरिकेने वस्त्रोद्योगावर ५०% टॅरिफ लावल्याने भारतीय कापड निर्यातीत मोठा फटका बसला असून, भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पॉवरलूम उद्योगावरील परिणाम कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरकारने टॅरिफचा परिणाम अभ्यासण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई – महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. “भाजपने असा आव आणला की न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला, पण प्रत्यक्षात हा निर्णय फसवणारा आहे,” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, “भाजपने मराठा आरक्षणासाठी नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-रायगड घाटरस्ता खचला!

रस्त्याच्या निकृष्ट कामावरून पर्यटकांचा सवाल – राष्ट्रीय महामार्ग विभाग अपघातानंतरच जागा होणार का? महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे जाणारा महाड–रायगड रस्ता गेल्या काही दिवसांत घाटात खचल्याने पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अपघात झाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डोळे उघडणार का?” असा थेट सवाल पर्यटकांनी उपस्थित केला आहे. महाड–रायगड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता आश्रमशाळांच्या शिक्षणावर सरकारची करडी नजर…!

मुंबई – राज्यात सत्ता बदलली की आदिवासी विकास खात्याला नवा मंत्री मिळतो. अनेकदा काही मंत्री फक्त पद भूषवण्यात समाधान मानतात आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर चाकोरीबद्ध कारभार करतात. मात्र काही मंत्री या समाजातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, किमान जीवनमान व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करतात. याची प्रचिती गुरुवारी मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आली. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभाग रचना; माजी नगरसेवकांसमोर राजकीय आव्हाने वाढली

By: (प्रतिक यादव) नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेने नुकतीच जाहीर केलेली नवीन प्रभाग रचना माजी नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. आतापर्यंत 111 वार्डांचा समावेश असलेल्या या महानगरपालिकेत आता केवळ 28 प्रभाग तयार करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात चार वार्डांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी 27 प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग तीन सदस्यीय ठेवण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्राहकांच्या सोयीसाठी सहकारी ग्राहक भांडार व मोबाईल व्हॅनद्वारे पीठ, तांदूळ- कांद्याची उपलब्धता – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई–केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने आता राज्यातील सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहेत. ‘भारत आटा’, तांदूळ आणि कांदा ही उत्पादने सहकारी ग्राहक भांडार व मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँडची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDI: हिंजवडी आयटी पार्क बंगळुरूला चालल्याचे अजित पवारांचे विधान सत्य ठरले – सचिन सावंत

मुंबई – थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) यावर्षी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कर्नाटक आघाडीवर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारपूर्वीही कर्नाटक एकदा पुढे गेले होते. “यशाचे श्रेय घेण्यासाठी फडणवीस पुढे येतात, तर अपश्रेयही स्वीकारले पाहिजे,” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सावंत म्हणाले की, “महाविकास आघाडी […]