ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेला छगन भुजबळांची दांडी

वर्धा

वर्ध्यात आज ओबीसींची मोठी सभा भरवण्यात आली आहे. या सभेसाठी सकाळी ११ ची वेळ ठरवण्यात आली होती. मात्र बराच वेळ तेथे एकही नेता न फिरकल्याने सभेबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. काही वेळानंतर हळूहळूच लोक जमा होत असल्याचं दिसत होतं.

दरम्यान या भव्य सभेत महादेव जानकरांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित आहेत. मात्र छगन भुजबळ मात्र उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलं आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने ओबीसी एल्गार सभेला छगन भुजबळ उपस्थित राहणार नाही. त्यामुळे इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार सभा घेण्यात येणार आहे.

जालन्यानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसींचा मेळावा झाला होता. त्यामुळे सर्वांच वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेकडे लक्ष होतं. आतापर्यंतच्या ओबीसी मेळाव्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांच्याकडून टीका करण्यात आली होती. यंदा छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष होतं. विशेष म्हणजे या सभेची तयारी भव्य केलेली असताना प्रत्यक्षात मात्र अपेक्षित गर्दी होऊ शकलेली नाही. अनेक खुर्च्या या रिकाम्याच दिसत होत्या.

जालना येथे झालेल्या पहिल्या ओबीसी मेळाव्यात काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती. मात्र, या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणामुळे वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, झालेल्या एकही ओबीसी सभेत वडेट्टीवार उपस्थित राहिले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात