महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररूम बैठकीत घेतला 15 प्रकल्पांचा आढावा

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या वॉररूम बैठकीत मागील बैठकीत चर्चेला आलेल्या 18 प्रकल्पांसह नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 15 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांना वेळेत आणि अचूक नियोजनासह पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश होता:
• मेट्रो लाईन 2B (डीएन नगर ते मंडाळे),
• मेट्रो लाईन 4 (वडाळा ते कासारवडवली),
• मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण),
• मेट्रो लाईन 6, 7A, 9
• ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह टनेल
• बोरिवली-ठाणे जोड बोगदा
• उत्तन-विरार सी लिंक
• शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर
• दहिसर-भाईंदर लिंक रोड
• गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
• उत्तर सागरी किनारा मार्ग इत्यादी.

मुख्यमंत्री म्हणाले की, “विकास प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि तात्काळ अंमलबजावणी गरजेची आहे. भूसंपादन, वन व पर्यावरण परवानग्या, तसेच झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया गतीने पार पाडा.”

त्यांनी धारावी पुनर्विकासासाठी अत्याधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञान वापरण्याचे आदेश दिले. तसेच वर्धा-नांदेड आणि वर्धा-गडचिरोली रेल्वे प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वाढवण बंदर प्रकल्पासाठी वनजमिनी संदर्भातील निर्णय लवकर घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनींच्या तातडीने अधिग्रहणाचे आदेश देण्यात आले. मागाठाणे–गोरेगाव डीपी रोड, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना यासह अनेक प्रकल्पांच्या तांत्रिक अडचणी दूर करून कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.

मागील वॉररूम बैठकीत 73 अडचणींपैकी 31 अडचणींवर मार्ग काढण्यात आले असून उर्वरित प्रलंबित विषयांवरही काम सुरू आहे. यातील कोणत्याही सूचनेची अंमलबजावणी रखडू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात