ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानीच्या आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरूवात

Twitter : @therajkaran

कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडीत केलेली ५२२ किमीची आक्रोश पदयात्रा आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून पुन्हा सुरू झाली.

https://twitter.com/therajkaran/status/1720449448801943708

मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. त्या पदयात्रेस सकाळी ८ वाजता राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून सुरवात होणार आहे.

सकाळी ठिक ६.३० वाजता राजू शेट्टी निवासस्थानापासून साखराळेकडे रवाना होणार असून ८ वाजता कारखाना प्रशासनास निवेदन देवून तिथून हुतात्मा कारखाना -नागठाणे – अंकलखोप – भिलवडी व वसगडे मुक्कामी असणार आहे. दि. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ व्या ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होईल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात