महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिनाचा समारोप; राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष ‘माय स्टॅम्प’चे प्रकाशन

मुंबई – भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या 90व्या वर्धापन दिन समारोप कार्यक्रम संपन्न झाला. मुंबईतील एनसीपीए सभागृहात झालेल्या या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कस्टमाईज्ड ‘माय स्टॅम्प’चे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वद वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाचे स्मरण करत, बँकेच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. देशाच्या आर्थिक विकासात आरबीआयने निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा गौरवशाली प्रवास

1 एप्रिल 1935 रोजी स्थापना झालेली रिझर्व्ह बँक आज देशाच्या आर्थिक स्थैर्याचा केंद्रबिंदू बनली आहे. बँकिंग आणि वित्तीय प्रणालीचे नियमन, आर्थिक धोरणांची अंमलबजावणी आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या भूमिकेमुळे आरबीआयची गणना जगातील अग्रगण्य मध्यवर्ती बँकांमध्ये केली जाते.

या सोहळ्याला राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गौरवशाली प्रवासाचा हा सोहळा देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक ठरला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात