महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आयुष्मान भारत समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष विश्वास; अधिकारात मोठी वाढ

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि गोरगरीबांचे ‘देवदूत’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ओमप्रकाश शेटे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २१ मार्च रोजी निर्गमित शासन निर्णयाला अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला असून, त्यांना अधिक व्यापक अधिकार देण्यात आले आहेत.

आरोग्य सुविधांमध्ये मोठे पाऊल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि सर्व शस्त्रक्रिया शासकीय योजनांच्या माध्यमातून केल्या जाव्यात, यासाठी डॉ. शेटे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

समितीची रचना

डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश आहे –
✔ सदस्य सचिव: राज्य आरोग्य हमी सोसायटीचे उपमुख्य कार्य अधिकारी
✔ सदस्य: वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दोन तज्ज्ञ
✔ सहसंचालक आरोग्य विभाग
✔ सहाय्यक संचालक, राज्य हमी सोसायटी
✔ सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

डॉ. शेटे यांना वाढीव अधिकार

आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांची सुसज्जता तपासणे, तसेच सामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार मिळतील यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, या प्रमुख जबाबदाऱ्यांसह डॉ. शेटे यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर वचक बसणार?

फडणवीस सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य सेवा एकाच छत्राखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनेतील गोंधळाबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डॉ. शेटे यांच्यावर आरोग्य व्यवस्थेवर वचक बसवण्याची जबाबदारी सोपवली आहे.

डॉ. शेटे या संधीचं सोनं कसे करतात? आणि ते नव्या अधिकारांचा कसा वापर करतात? हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात