महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोदींच्या पहिल्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ स्मार्ट सिटी योजनेचा अपयशी अंत!

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेचा आज अपयशी अंत झाला असल्याची जोरदार टीका आम आदमी पार्टीने केली आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आणि स्पर्धेनंतर १०० शहरे निवडण्यात आली होती. ही योजना मोदी सरकारचा पहिला महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प होता, मात्र आज त्याची अंमलबजावणी थांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मार्ट सिटी योजनेमध्ये प्रत्येक गोष्टीचे संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण करणे शक्य होते, त्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसते, असे आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

पुणे शहराच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी ‘वाहतूक कोंडी’ हा नागरिकांनी मांडलेला मुख्य विषय होता. मात्र, त्यावर उपाय शोधण्याऐवजी ‘क्षेत्रनिहाय विकास’ योजनेला प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी आधीच विकसित असलेला औंध व इतर परिसर निवडण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प केवळ दिखावा असल्याचे त्यावेळीच स्पष्ट झाले होते.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अपयश ठरलेले प्रकल्प:

➡ शाळांसाठी अतिरिक्त सुविधा: औंधमधील काही शाळांना फक्त अतिरिक्त सुरक्षा रक्षक देण्यात आले, आणि त्यालाच स्मार्ट सिटी योजनेचा भाग म्हणून मांडण्यात आले.
➡ एटीएमएस (सिग्नल यंत्रणा प्रकल्प): पुणे महापालिकेने या प्रकल्पाचा यशस्वी परिणाम दाखवलेला नाही. त्याची कोणतीही प्रभावी परीक्षण यंत्रणा नाही.
➡ सायकल योजना: ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
➡ थीम-बेस्ड उद्याने: योजनेचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.

या योजनेसाठी किती खर्च झाला? तो कुठे केला? त्याचा नागरिकांना किती उपयोग झाला? याचा सविस्तर हिशोब पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

विशेष म्हणजे, मोदी किंवा भाजपने कोणत्याही निवडणूक प्रचारात स्मार्ट सिटी योजनेचा उल्लेख केला नाही, याकडेही मुकुंद किर्दत यांनी लक्ष वेधले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात