महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभरात विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात; महाराष्ट्राला वगळल्याने वाद — बॅरिस्टर विनोद तिवारींची सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचे “विशेष सघन पुनरिक्षण अभियान” (Special Intensive Revision – SIR) सुरू झाले असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये या प्रक्रियेची अंमलबजावणी प्राधान्याने होत आहे. मात्र, या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश न केल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमितता दूर करण्यासाठी महाराष्ट्रालाही या प्रक्रियेत सामील करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ कायदेतज्ज्ञ बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केली आहे.

तिवारी यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला थेट सवाल करताना म्हटले की, महाराष्ट्रात लाखो डुप्लिकेट आणि तिबार नावे मतदार याद्यांमध्ये असल्याचा आरोप सर्वच पक्षांकडून होत आहे. अशा परिस्थितीत शुद्ध मतदार यादी उपलब्ध होण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीचा अवमान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही Special Intensive Revision तातडीने राबवून निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तिवारी यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सध्याच्या मतदार याद्या अत्यंत विवादित स्थितीत आहेत आणि या याद्यांच्या आधारे निवडणुका घेतल्या गेल्यास त्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह उभे राहील. राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या दुरुस्तीचे अधिकार नसल्याने ही जबाबदारी केंद्र निवडणूक आयोगाने स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून राज्यातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी या मागणीला समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला.

तिवारी यांनी हेही लक्षात आणून दिले की, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असले तरी चुकीच्या यादीवर ठाम राहून निवडणूक घेणे हा जनतेच्या अधिकारांवर घाला आहे. मतदार याद्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी काही महिने लागले तरी ते लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चातही शुद्ध आणि अद्ययावत मतदार यादीची मागणी जोरदारपणे करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर भाष्य केले आहे. चुकीच्या याद्या वापरून राज्यात निवडणुका झाल्या तर लोकशाहीला मोठे नुकसान होईल, असे तिवारी यांनी नमूद केले असून, “आम्ही शांत बसणार नाही,” असे ते म्हणाले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात