ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकप्रतिनिधींना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे, रविकांत तुपकर संतापले

मुंबई

सोयाबीन-कापसाच्या भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं म्हणज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.

सभागृहात सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आमदार-खासदारांनी भांडून रान उठवलं पाहिले, रस्त्यावर उतरूनही नेते मंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तुपकरांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं आहे.

तुपकरांनी गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) सोबायीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी चार दिवस अन्नत्याग करीत आंदोलन पुकारलं होतं. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते वारंवार राज्य सरकारसोबत बैठका घेत आहेत. मात्र अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.

रविकांत तुपकरांचा संताप
“सोयाबीन-कापसाच्या भावावाढीबाबत आमदार-खासदारांना प्रश्न विचारा…ज्यांना आपण निवडून दिले,त्यांनी सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर सभागृहात भांडून रान उठवलं पाहीजे. सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची, विशेषतः सत्ताधारी नेत्यांची व सरकारची जबाबदारी आहे. आम्ही चळवळीतील कार्यकर्ते, तथा आंदोलक आहोत. आम्ही कोणत्या संवैधानिक पदावर नाही, चळवळी करणे, आंदोलन करणे, आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरणे,आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणे व सरकारवर शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करणे हे आमचे काम आहे, हे काम आम्ही दोन दशकांपासून प्रामाणिकपणे व ताकदीने करीत आहोत. पण रस्त्यावर आक्रमकपणे उतरूनही सरकार आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि आपण ज्यांना निवडून दिले ती नेतेमंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल शब्दही बोलायला तयार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना,नेत्यांना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे…!”

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात