महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; माजी न्यायमूर्तींसह मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर घेतला निर्णय..!

Twitter : @NalavadeAnant

जालना

मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा घडवून पुढील प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं. आता सरसकट आरक्षण द्यायला सरकार तयार झालं आहे. त्यामुळे त्यांना वेळ दिला पाहिजे. मात्र यानंतर पुन्हा वेळ मिळणार नाही ही शेवटचीच वेळ आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत २ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीला २४ डिसेंबरपर्यंत सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशी मागणी केली होती. परंतु शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत मुदत मागितल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी चर्चा करत सरकारला २ महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात