महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर हे पत्रकारितेचे तेजस्वी तारा – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

मुंबई : “देवभूमी गोव्यात अनेक रत्ने जन्माला आली, त्यापैकी एक तेजस्वी तारा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ संपादक लक्ष्मीदास बोरकर,” असे गौरवोद्गार केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी, ज्येष्ठ पत्रकार, आणि लेखक लक्ष्मीदास बोरकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “समस्यांची अभ्यासपूर्ण जाण असलेल्या आणि लेखणीतून अचूक उपाय सुचवणाऱ्या बोरकरांनी समाजसेवेस मोलाचे योगदान दिले. पोर्तुगीज सत्तेचा बंदीहुकूम झुगारून त्यांनी राम मनोहर लोहिया यांना गोव्यात सभास्थानी आणले, त्यातून झालेली अटक आणि छळ त्यांनी सहन केला. त्यांच्या लेखनात गोडवा होता, पण ते लेखन हे दुर्बलांचा आवाज होते.”

नाईक यांनी बोरकरांच्या सामाजिक जाणिवा, पत्रकारितेतील योगदान आणि सत्यप्रिय वृत्तीचे स्मरण करत “त्यांचा आदर्श जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,” असे सांगितले.

कार्यक्रमात उपस्थित दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे भावुक होत म्हणाले, “मी बोरकरांच्या हाताखाली घडलो. त्यांनी पितृवत प्रेम दिलं. एक चूक केल्यावर मी राजीनामा दिला होता, पण त्यांनी माझं राजीनामा पत्रच फाडून टाकलं. गोव्यासाठी त्यांचं योगदान अतुलनीय आहे.”

लोकसत्तामधील त्यांच्या सहकाऱ्यांपैकी प्रकाश कुलकर्णी म्हणाले, “आज संपादक चूक उपसंपादकाच्या नावावर ढकलतात, पण बोरकर स्वतः बातम्या करत असत. त्यांच्या उपस्थितीनं कार्यालयात चैतन्य निर्माण होई. ते साक्षात पत्रकारितेचे चैतन्य होते.”

कुलकर्णी यांनी हेही नमूद केले की, “ते न्यूज एडिटर झाले, पण लोकसत्तेत संपादक होऊ शकले नाहीत, ही खंत आजही राहते.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी बोरकरांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. तसेच, तीन पुस्तकांच्या आवृत्त्यांचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत कोषाध्यक्ष जगदीश भोवड यांनी, आभार प्रदर्शन संजय तांबेकर यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. Avatar

    Jai U. Nayak, sr. Journalist, Panaji Goa

    April 5, 2025

    ‘सातबाऱ्या’ नव्हे सातबारा
    गोव्यात त्याला ‘एक चौदा’ चा उतारा म्हणतात.
    पत्रकारितेच्या विषयावर माझे “प्रत्यक्ष पत्रकारिता” नामक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. अमेझॉन वर उपलब्ध आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात