महाराष्ट्र ताज्या बातम्या

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घरांचे स्वप्न पूर्तता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “मुंबईकरांची घराची समस्या दूर करण्यासाठी सामूहिक पुनर्विकास योजना राबवली जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रभादेवी येथील सहा पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी करताना शिंदे म्हणाले, “मुंबईकरांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आवश्यकतेनुसार नियम व कायद्यांमध्ये बदल केले जातील.”

ते पुढे म्हणाले, “सामान्य मुंबईकरांना परवडणारी, प्रशस्त घरे देण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकास योजना राबवली जाईल. यामध्ये आरोग्य सुविधा, बगीचा, खुले मैदान इत्यादी प्राथमिक सोयीसुविधा प्रदान केल्या जातील.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून, याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. लवकरच गृहनिर्माण धोरण आणले जाईल, ज्यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून विविध गटांसाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटी रुपयांची विकास योजना राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे गणेश भक्तांना सोयी सुविधा मिळतील, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांच्या उपस्थितीत दादर, माहिम आणि प्रभादेवी येथील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा बैठक पार पडली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात