ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी शासन सकारात्मक : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

X : @therajkaran

नागपूर

राज्यात स्वतंत्र तालुके निर्मितीसाठी होत असलेल्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक आहे. मोठ्या, मध्यम आणि छोट्या तालुक्यांसाठी किती पदे असावी, याचा आकृतीबंध निश्चिती करण्यात आला आहे. तालुका निर्मिती अभ्यासासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या (Konkan Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले. 

आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी नागपूर जिल्ह्यातील बहात्तर गावे असलेल्या देवलापार तहसीलसाठी अप्पर तलसीलदार हे पद संमत असूनही नियुक्ती झालेली नाही याकडे विधानसभा नियम १०५ नुसार लक्षवेधी विचारली होती. तहसीलदारांसह अन्य नियमित अधिकार्‍यांची पदेही रिक्त असल्याने देवलापार तालुक्याची पुर्नरचना करण्यात यावी, अशी मागणी जयस्वाल यांनी प्रश्न विचारताना केली.

उत्तर देतांना महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘‘कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल ऑक्टोबर २०२३ पर्यंत येणे अपेक्षित होते. अहवाल तात्काळ सादर करावा याकरिता त्यांना कळविण्यात येईल. नवीन तालुक्यांची निर्मिती करतांना मोठे, मध्यम आणि छोटे असे तालुक्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. मोठ्या तालुक्यांसाठी २४, मध्यम २३, तर छोट्या तालुक्यांसाठी २० पदे निश्चित करण्यात आली आहेत; मात्र याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तालुकानिर्मितीचा निर्णय घेता येईल. तालुक्यांच्या निर्मितीमध्ये तीर्थक्षेत्र असल्यास तेही विचारात घेता येईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात