ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच : खा. सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून (Gram Panchayat election results) अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले. 

पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे आहे, हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Meeting between PM Narendra Modi and Praful Patel) यांनी जो त्यांच्याशी संवाद साधला त्यावरून दिसून येतो. त्यामुळे माझ्या नेत्याचा अभिमान आम्हाला आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. 

भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो, असा आरोप आता आमच्यावर करण्यात येतो. मात्र ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत (BJP) जाण्यासाठी खुद्द शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती मग ते काय होते? अशी संतप्त विचारणाही खा. तटकरे यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात