ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी मुंबईत येणार!उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई – मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १ मे ते ४ मे २०२५ दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या समिटचे उद्घाटन १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी बीकेसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या समिटचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदी १ मे रोजी दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा देखील सहभाग असणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले की, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून, हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर आहे. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रातच चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे मनोरंजन, पर्यटन व उद्योग क्षेत्रात मुंबई अग्रस्थानी आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटनस्थळे आणि औद्योगिक क्षमता पोहोचविण्याचा या समिटचा उद्देश आहे.”

या समिटमध्ये ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सहभागी होणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही या समिटचा भाग असतील.

या चार दिवसीय कार्यक्रमात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन यांसारखी विशेष दालनं उभारण्यात येणार आहेत, ज्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्सेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

विशेष आकर्षण म्हणून, ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ए. आर. रहमान यांच्या लाईव्ह संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“ही संधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे,” असे आवाहनही उदय सामंत यांनी यावेळी केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात