महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागतिक शिखर परिषदेत सादर होणार ‘देवाभाऊ’ चष्मा

अवघ्या ३३ रुपयात १४० देशांना चष्मा पुरवण्याचा संकल्प

बदलापूरच्या साकिब गोरेंची गरुडझेप

बदलापूर : अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली ३४ वर्ष समाजकार्य करणारे बदलापुरातील साकिब गोरे यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या ‘व्हिजन फ्रेंड’ संस्थेच्या माध्यमातून अवघ्या ३३ रुपयांत चष्मा तयार करण्यात आला आहे. ‘देवाभाऊ’ नावाने ओळखला जाणारा हा चष्मा काठमांडू येथे होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत सादर केला जाणार आहे.

हा चष्मा नेपाळच्या काठमांडूत २९ एप्रिल ते १ मे दरम्यान होणाऱ्या समिटमध्ये IAPB (जागतिक अंधत्व निवारण संघटना) आणि WHO (जागतिक आरोग्य संघटना) यांनी निवडला तर, १४० देशांमध्ये ३३ रुपयांमध्ये, म्हणजेच ०.३८ डॉलर्समध्ये गोरगरीब लोकांना उपलब्ध होईल.

IAPB ही जागतिक अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी काम करणारी संस्था आहे. काठमांडूत आयोजित शिखर परिषदेत ७६ देशांतील ७०० नामांकित संस्था सहभागी होणार आहेत, ज्यात साकिब गोरे यांच्या ‘व्हिजन फ्रेंड’ संस्थेचाही समावेश आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने, साकिब गोरे यांनी आतापर्यंत १७०० गावांमधून २६ लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे आणि १७ लाख चष्म्यांचे वितरण केले आहे. त्याचबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांपासून प्रेरित होऊन, त्यांनी ‘देवाभाऊ’ नावाने स्वस्त, टिकाऊ आणि उपयुक्त चष्म्यांची सीरिज तयार केली आहे. ३३ रुपयांपासून २६० रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांच्या माध्यमातून जगात क्रांती घडेल, असा विश्वास साकिब गोरे यांना वाटतो.

सद्यस्थितीतील २.५ अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत, त्यापैकी १.१ अब्ज लोकांना चष्मा मिळू शकलेला नाही. जास्त किंमतीमुळे गोरगरीब लोकांना चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे. मात्र, ३३ रुपयांत ‘देवाभाऊ’ चष्मा त्या सर्वांना मार्ग दाखवेल, असे साकिब गोरे यांनी म्हटले आहे.

काठमांडू येथील शिखर परिषदेमध्ये ७०० संस्थांमधून तीन संस्थांची निवड करण्यात आलेली आहे, ज्यात साकिब गोरे यांची ‘व्हिजन फ्रेंड’ संस्था आहे. या तीन संस्थांमधून एकाची IAPB कडून अंतिम निवड केली जाईल. त्यामुळे, काठमांडूच्या समिटमध्ये ‘देवाभाऊ सीरिज’ चष्म्यांची निवड होईल का, याकडे बदलापुरकर आणि महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात