महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

INDIA alliance rally : उद्धव ठाकरेंना पाच मिनिटात भाषण उरकावं लागणे दुःखदायक…..! उद्योगमंत्री उदय सामंत 

X: @therajkaran

इंडिया आघाडीचा कालचा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची काही आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र येवुन सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून कालचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याची सणसणीत टिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना भाषणासाठी फक्तं पाचच मिनिट देण्यांत आली हे अत्यंत दुःखदायक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे जेव्हा याच शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते, असाही टोला सामंत यांनी लगावला.

सामंत पुढे म्हणाले, कालच्या मेळाव्यात उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. मात्र अन्य पक्षांच्या नेत्यांनी दिवंगत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या पण भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरु होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले.त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कोणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले असून महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात