महाराष्ट्र ताज्या बातम्या

रेवस-रेडी सागरी महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : कोकणातील रेवस-रेडी सागरी महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सध्या सुरू असून, प्रलंबित पुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. या मार्गाद्वारे कोकणातील ८९ धार्मिक स्थळे जोडली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिली.

महामार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार

भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी ‘रेवस-रेडी सागरी महामार्ग पूर्ण व्हायला आणखी किती वेळ लागणार?’ असा तारांकित प्रश्न विचारला होता. उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, हा महामार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. या महामार्गावर एकूण नऊ पूल असून, त्यापैकी पाच पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, तर दोन पुलांचे काम सुरू आहे.

दाभोळ आणि काळबादेवी पुलांच्या कामात तांत्रिक अडचणी

दाभोळ आणि काळबादेवी येथील पुलांच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी असून, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात