महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ५६ गड-दुर्ग राज्य सरकारकडे हस्तांतरित करा – आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५६ गड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांचे हस्तांतरण राज्य पुरातत्व विभागाकडे करावे, अशी विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे केली आहे.

गड-दुर्ग संवर्धनासाठी राज्य सरकारची मागणी

राज्यात सध्या राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग असून, त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले गड-दुर्ग राज्य सरकारकडे दिल्यास त्यांच्या दुरुस्ती आणि संवर्धनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल, असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

संवर्धनासाठी तज्ज्ञ आणि निधी उपलब्ध

महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे वारसा संवर्धनातील विशेष तज्ञ आणि वास्तुविशारद असून, त्यांच्या माध्यमातून हे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल. यासोबतच, पर्यटनाला चालना देण्यासाठी खासगी संस्थांकडून ‘सीएसआर’ निधीही उपलब्ध होऊ शकतो.

गड-दुर्गांचे संरक्षण आमचे कर्तव्य

“हे गड-दुर्ग आपल्या इतिहासाची साक्ष देतात. त्यांचे जतन करणे ही आमची जबाबदारी आणि अभिमानाचे कार्य आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्ग राज्य पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करावेत,” अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात