महाराष्ट्र ताज्या बातम्या

’जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार हा माझ्यासाठी आशीर्वाद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ‘जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वोच्च आनंद, समाधान आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझे दायित्व अधिक वाढले आहे. सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे हाच माझा धर्म आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करण्यासाठी बळ मिळो, अशी प्रार्थना करतो,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वारकरी संप्रदायातील मानाचा ‘जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान झाल्याबद्दल विधानसभेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. वारकरी, शेतकरी, माझ्या लाडक्या बहिणी-भावंडांचेही तो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्र सेवेचे व्रत दिले, तर धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे त्या संस्कारांचा सन्मान आहे.

मुख्यमंत्री असताना वारकरी संप्रदायासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
• पहिल्यांदाच वारकरी दिंड्यांसाठी अनुदान दिले.
• वारकरी विमा योजना सुरू करून वारकऱ्यांचा विमा काढला.
• वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
• पालखी मार्ग आणि पंढरपूर विकासाची कामे मार्गी लावली.
• विठ्ठल दर्शन रांगांसाठी निधी मंजूर केला.
• ‘ब’ कॅटेगरीतील तीर्थक्षेत्र मंदिरांच्या निधीत वाढ करून २ कोटींवरून ५ कोटी रुपये केला.
• वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले.

‘‘वारकरी संप्रदायाहून कोणीही मोठे नाही. त्यांच्या समाजावर असलेल्या उपकारांची परतफेड सात जन्म घेतली, तरी होणार नाही. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे आणि मी वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटीबद्ध राहीन,’’ असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात