महाराष्ट्र ताज्या बातम्या

Jan Suraksha Act : पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट शब्द

मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही आणि पत्रकारांच्या निर्भीड पत्रकारितेला या कायद्याचा फटका बसणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या विधेयकातील काही तरतुदींवर पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पत्रकार संघटनांच्या सूचना अंतिम मसुदा तयार करताना नक्कीच विचारात घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध १२ पत्रकार संघटनांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा”च्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रदीर्घ बैठक झाली. या मंचाच्या वतीने एस.एम. देशमुख, संदीप चव्हाण, दिलीप सपाटे, यदु जोशी, विशाल सिंग, पंकज दळवी, इंद्रकुमार जैन, प्रदीप मैत्रा, दीपक भातुसे, श्रीकिशन काळे यांनी विधेयकातील तरतुदींवर पत्रकारांचा रोष मांडला.

पत्रकार प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले की, या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होण्याची भीती समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये आहे. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा व्यक्तिविरोधी नसून नक्षली विचारधारा पसरवणाऱ्या आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांच्या विरोधात आहे.

फडणवीस म्हणाले की, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांत यासारखे कायदे अस्तित्वात असून, महाराष्ट्रात मात्र अशा कायद्याच्या अभावामुळे नक्षली संघटनांची केंद्रे येथे स्थापन होत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कायद्याची अंमलबजावणी एका स्वतंत्र तीन सदस्यीय न्यायाधीश समितीच्या मंजुरीनंतरच होणार असल्याने दुरुपयोगाची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार संघटनांनी जर काही महत्त्वाच्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या, तर त्या नक्कीच अंतिम मसुद्यात विचारात घेतल्या जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीस मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, विधिमंडळ वार्ताहर संघ, अधिस्वीकृती पत्रकार समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई यूनियन ऑफ जर्नालिस्ट्स, बीएमसी वार्ताहर संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघ, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स ऑफ इंडिया आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात