ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये लोकसभेच्या जागांबाबत ठरलं? काय आहे महाराष्ट्राचा फॉर्म्युला?

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून विरोधी पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. दरम्यान काल ९ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जागावाटपावरुन इंडिया आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात बैठक पार पडली.

बैठकीबाबत एका वृत्त समुहाने दिलेल्या बातमीनुसार, राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०-२० जागांवर निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला २ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वीपर्यंत काँग्रेसकडून २६, शिवसेनेकडून २३ आणि प्रकाश आंबेडकरांकडून १२ जागांची मागणी केली आहे.

काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, बैठक संपल्यानंतर आम्ही आनंदात बाहेर पडलो आहोत. संघर्षाच्या या काळात आम्ही एकमेकांसोबत राहू आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जागा घेऊन येऊ असंही राऊत यावेळी म्हणाले. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत,

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात