ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : वंचितकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर, मविआसोबतच्या युतीचं काय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वंचित आणि मविआमध्ये तणाव असल्याची काही कारणं समोर आली आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आज रविवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत वंचितच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. यात अकोल्यातून ते स्वत:, वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे हा पेच अधिक वाढला आहे.

आधीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी मविआकडे २७ जागांची मागणी केली होती. मविआच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार आणि ३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत अशीही मागणी केली होती. मात्र वंचितच्या या प्रस्तावावर अद्याप मविआकडून निरोप कळवण्यात आलेला नाही, असं समजते. याशिवाय मविआने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी केली होती, मात्र यावरही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात